मुंबई : तौक्ते चक्रीवादळ सध्या गुजरातमध्ये धडकले आहे.कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा तडाखा दिल्यानंतर गुजरातकडे वादळाने मार्गक्रमण केले होते. या वादळामुळे कोकणासह गुजरातमधील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज गायब असून, शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यावरून आता प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात सध्या दुसऱ्या जिल्हयात जाताना ई पास आवश्यक आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दौरा करण्यासाठी ई-पास काढलाय का, प्रश्न एका आरटीआय कार्यकर्त्याने मुख्य सचिवांना विचारला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:29 PM 20-May-21