रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा पुलापुढील वळणात बेदरकारपणे ट्रक (एमएच१२-एफझेड-४२६५) चालवून पुढील टेम्पो(एमएच-०८-डब्ल्यू -०५२२)ला पाठीमागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवार, १६ मे रोजी दुपारी २.३० वा. सुमारास झाला. सत्यनारायण विठ्ठलसिंग ठाकूर (रा. भवानी पेठ, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार कांबळे करत आहेत
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 20-May-21