राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीपाच्या मशागतीसाठी 10 हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे

0

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारकडे केली आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यामातून सरकारसमोर या मागण्या मांडल्या आहेत. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, तब्बल १४ हजार ७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना दिलासा दिला आहे. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:09 PM 20-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here