रत्नागिरी : येथील प्रतिष्ठीत नागरिक शिवसेनेचे माजी नगरसेवक रविंद्र बिर्जे यांच्या पत्नी राजश्री बिर्जे यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्या स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सेवाभावी वृत्तीच्या होत्या, हाती घेतलेले कोणतेही काम पूर्णत्वास नेणयाची त्यांची तयारी असे. कोणाच्याही सुख-दुःखात स्वत:च्या बाजूने जेवढी मदत त्या सढळ हस्ते करत. होळी पौर्णिमा ई. धार्मिक सणांच्यावेळी श्री देव भैरी मंदिर, जुगाई मंदिर तसेच कार्तिक एकादशीला विठ्ठलमंदिर येथे गावातील सर्व महिलांना घेवून रांगोळी काढण्यात तसेच महिलांचे लेझीम पथक, महिलांचे ढोल-ताशा पथक इ. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार होता. वार्षिक हरिनाम सप्ताहात देखील त्या उत्साहाने सहभागी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, पाच मुली, तीन जावई, तीन भाऊ, एक बहिण, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.एकाच घरातील चौघांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण मुरुगवाडा गावामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:58 PM 26-May-21