जर पाकिस्तानने हल्ला केला तर राज्यांवर सोडणार का?; लसींवरून केजरीवालांचा केंद्राला सवाल

0

नवी दिल्ली : राज्यांना लसीच्या बाबतीत केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करून गेल्या चार दिवसांपासून 18 ते 44 वयाच्या नागरिकांचे लसीकरण बंद आहे. हे एकट्या दिल्लीतच नाही तर देशभरातील चित्र आहे. नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यापेक्षा आम्हाला आहेत तीच बंद करावी लागत आहेत, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर केली. राज्यांना जगभरातील कंपन्या कोरोना लस पुरविण्यास तयार नाहीत. केंद्राने हात वर केले आहेत. केंद्र का खरेदी करत नाहीय? लसींची खरेदी आपण राज्यांवर सोडू शकत नाही. आपला देश कोरोनाविरोधात युद्ध लढत आहे. जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असा सवाल केजरीवालांनी मोदी सरकारला केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:44 PM 26-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here