‘महाराष्ट्रात लॉकडाऊन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल’

0

मुंबई : राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून ठाकरे सरकार लॉकडाऊन वाढवणार की उठवणार यासंबंधी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ठाकरे सरकारने कठोर निर्बंध जाहीर केले असून परिस्थिती नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन वाढवण्यात आला होता. पण सध्या रोजची रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाउन शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ठाकरे सरकार लॉकडाउन उठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ‘राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:35 PM 26-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here