‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करुन काय साध्य होणार?’; खासदार संभाजीराजे

0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता सरकारवर गंभीर आरोप केलाय. संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट केलंय. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय. संभाजीराजे यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. अशावेळी संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर तीन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी राज्य सरकारसमोर 3 कायदेशीर पर्याय आणि 4 गोष्टी सुचवल्या होत्या. त्यानंतर आज संभाजीराजे यांनी सरकारवर हा गंभीर आरोप केलाय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:11 PM 31-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here