मराठा आरक्षण: काँग्रेसने अण्णासाहेब पाटलांची हत्याच केली, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

0

बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाकडून मोर्चा काढण्याचा इशारा दिले जात आहेत. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजेंनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सामंजस्याने काम करण्यास सांगितले आहे. यावरुनच आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. विनायक मेटे यांनी उद्या बीडमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्च्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. १९८२ मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणांसदर्भात बळी घेण्याचं पहिलं काम काँग्रेसनं केल आहे. हा माझा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काँग्रेसच्या हत्याच आहेत, असा गंभीर आरोपही मेटेंनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:02 PM 04-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here