…तर वेगळा विचार करणार; मनसे-भाजपा युतीबाबत फडणवीसांचे भाष्य, पुन्हा रंगल्या चर्चा

0

मुंबई : आगामी महापालिकेच्या निवडणूकीत भाजपा आणि मनसे यांची युती होणार की नाही, यासंदर्भात गेल्या काही दिवसांआधी चर्चा सुरु होती. त्यांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वेबिनारमध्ये युतीबाबत केलेल्या वक्त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. एका वेबिनारमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलंय किंवा स्वीकारत आहेत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आमचा अजेंडा व्यापक आहे. जी काही क्षेत्रीय अस्मिता असते ती आमच्याकडे आहे. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करु. पण क्षेत्रीय अस्मितेसोबत आम्हाला राष्ट्रीय अस्मिताही आम्हाला महत्वाची आहे. त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसाठी म्हणजेच मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. पण मराठी माणसावर अन्याय होऊ द्यायचा नाही यासाठी दुसऱ्यावर अन्याय करायचा आणि आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देत नाही अशी भूमिका घ्यायचं आम्हाला योग्य वाटतं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. क्षेत्रीय अस्मिता एक नंबरवर असली तरी राष्ट्रीय अस्मिता विसरता येणार नाही, या मताचे आम्ही आहोत. ही मतं आता तरी आमची आणि मनसेची वेगवेगळी आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच ती मतं जुळली तर वेगळा विचार करणार, पण आज तरी ती जुळत नाहीत. ती जुळत नसली तर युतीचा कोणता प्रश्नच निर्माण होत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना- भाजपा युती तुटल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजपनं मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्याचा निर्धार केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 05-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here