रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 10 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या मृत्यूपैकी सर्वाधिक 4 रत्नागिरी तालुक्यातील तर राजापूर 3, चिपळूण 2 आणि संगमेश्वर तालुक्यात एका मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 330 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 388 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 262, खेड 132, गुहागर 95, दापोली 116, संगमेश्वर 161, लांजा 68, राजापूर 96 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.35% आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:55 PM 05-Jun-21