‘मुख्यमंत्री लायक असते तर दिल्लीत येण्याची गरज नव्हती’ : नवनीत राणा

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर जळजळीत शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती. आईबाप हे मुलांसाठी कधी रडत नसतात. उद्धव ठाकरे यांना विविध विषयांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना भेटायचे होते. ही संधी त्यांनी साधली, असे नवनीत राणा यांनी म्हटले.

त्या मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या निकालासंदर्भातही प्रतिक्रिया दिली. अमरावतीच्या जनतेने ज्यांना पराभूत केले ते उत्साहाच्या भरात न्यायालयात गेले. आता मला भविष्यात सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. माझी शिवसेनेसोबतची राजकीय लढाई सुरु राहील, असे नवनीत राणा यांनी सांगितले. माननीय न्यायालयाने या निकालास 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे,,सर्वोच्च न्यायालयाच्या सुटी असल्यामुळे आपल्या वकिलांच्या मागणीचा न्यायालयाने केला विचार या आधी सर्वोच्च न्यायालयाचे अधिन असणाऱ्या जातपडताळणी समितीने माझे जातप्रमाणपत्र तीनवेळा पूर्ण छाननी करून वैध असल्याचा अहवाल सादर केला होता. माननीय उच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे त्याचा आदर करून घटनादत्त अधिकाराचा पूर्ण वापर करून माझी सत्य भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपण दाद मागणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:13 PM 08-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here