खरीप हंगामासाठी भरारी पथकाची नियुक्ती

0

रत्नागिरी : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२१-२२ साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये पुढील अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर नियुक्त केलेल्या भरारी पथकामध्ये कृषी विकास अधिकारी (जि. प.) अजय शेंडे हे पथक प्रमुख असून, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जी. आर. मुरकुट हे सदस्य सचिव असणार आहेत. भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी, प्रकाश सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण, दीपक कुंटे, उपविभागीय कृषी अधिकारी दापोली, एस. एस. पंडित, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी, मनोज मोदी, निरीक्षक वैधमापनशास्त्र, रत्नागिरी हे सदस्य असणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी कळविले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीस कृषी विभागाने जिल्ह्यात भरारी पथक नेमल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारींसंदर्भात तातडीने दखल घेतली जाणार आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:11 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here