नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटलांचं नाव द्या; मागणीसाठी मानवी साखळी आंदोलन

0

नवी मुंबई : दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कळवा नाका आणि कळवा नाका इथपासून ते नवी मुंबई पर्यंत साखळी आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात असताना बाळासाहेबांऐवजी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न देता प्रकल्पग्रस्तांचे नेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आज मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई , पनवेल , उरण , ठाणे , मुंबई येथील आगरी – कोळी जनतेकडून हे आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनाला भाजप आणि आरपीआय पक्षाकडून जाहिर पाठिंबा देण्यात आला होता. उरण ते पनवेल, पनवेल ते नवी मुंबई, नवी मुंबई ते ठाणे, ठाणे ते मुंबई अशा पद्धतीने हायवेवर मानवी साखळी करून दि बा पाटील यांच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:17 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here