पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राजधानी दिल्लीत एकांतात अर्धा तास चर्चा झाली. त्यावरुन राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र मोदी-ठाकरे यांच्या भेटीची जे चर्चा करतात त्यांचा अभ्यास कमी आहे आणि ही मुद्दाम केलेली चर्चा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्याशी संवाद साधला. एक पार्टी अशी आहे, तिला नेहमी असं वाटतं की आपण राज्यात आणि देशात सत्तेत राहावं, असा अंहकार नेहमी पाहायला मिळतो, अशा शब्दात रोहित पवार यांनी नाव न घेता भाजपवर जोरदार टीका केलीय.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 10-Jun-21