पुणे : एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र हळूहळू सावरत असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींनी मात्र वेग पकडला आहे. आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उडालेल्या चर्चांचा धुराळा खाली बसत नाही तोच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. याबाबत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असे वक्तव्य करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मात्र, पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी राहतील का राष्ट्रवादी पण दावा करणार? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली. पुणे जिल्हा परिषदेला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी सुळे यांनी प्रशांत किशोर व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बैठकीबाबा बोलताना मी प्रत्यक्ष त्या बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे त्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही असे म्हणाल्या. तुम्हाला ही असंच वाटतं का ? उद्धव हेच ५ वर्ष मुख्यमंत्री पदी कायम राहतील का ? राष्ट्रवादी दावा क्लेम करणार ? या प्रश्नावर सुळे यांनी ५ वर्षे महाविकास आघाडी सरकार टिकणार हे पवार साहेबांनी सांगितले आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर एकदा पवार साहेब बोलले की आम्ही कुणी बोलत नाही असे स्पष्टपणे सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 14-Jun-21