रत्नागिरी : अतिवृष्टी, वादळ यामुळे शाळांच्या जुन्या इमारतींचे नुकसान होते. दरवर्षी प्रशासनाकडून सर्वे करण्यात येऊन नादुरूस्त शाळा, वर्गखोल्यांची यादी तयार करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील २६२ शाळांच्या इमारती धोकादायक झाल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रत्यक्ष शाळा भरलीच नाही. मुलांनी ऑनलाईन अध्यापन केले. यावषीर्ही गतवर्षीप्रमाणेच स्थिती आहे. असे असले तरीही शाळांचा सुरक्षेबाबत शिक्षण विभागाकडून खात्री करण्यात येते. यंदाच्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील २६२ शाळांच्या इमारती धोकादायक ठरल्यात आहेत. ४२ शाळांच्या पन्नास वर्गखोल्या नव्याने बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी २ कोटी ७७ लाख ३० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र एकूण ९०४ वर्गखोल्या नादुरुस्त असून त्यासाठी २६ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपये निधीची आवश्यकता आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:40 PM 17-Jun-21