भडकंबा मोरेवाडीतील ग्रामस्थांनी केली मोडकळीस आलेल्या विद्युत पोलची डागडुजी

0

रत्नागिरी : दि. २९ मे २०२१ रोजी झालेल्या वादळाने पाकतेकरवाडीतील विद्युत पोल गंजून जीर्ण झाला होता. त्यावेळी जीवितहानी होता होता टळली होती. त्यावेळी मोरेवाडी व पाकतेकरवाडी मधील गंजून जीर्ण झालेले पोल बदली करण्याची विनंती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या पावसाळा सुरू आहे व शेतीची कामे चालू आहेत. सदर पोल हे भातशेती मध्ये आहेत. जीव महत्वाचे म्हणून जीवीत हानी टाळण्यासाठी महावितरण कंपनीच्या भरवशावर न राहता मोरेवाडी तील स्थानिक ग्रामस्थांनी जाड लोखंडी सळ्या, खडी, सिमेंट व वाळू इत्यादीचा वापर करून मोडकळीस आलेल्या मोरेवाडीकडे येणाऱ्या विद्युत पोलची डागडुजी करण्यात केली. यावेळी महेंद्र मोरे, संजय मोरे, तुकाराम मोरे व अजय मोरे यांनी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:15 PM 17-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here