पुणे : राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे तिन्ही पक्षातील वरिष्ठ ठरवतील. मात्र, कोरोना नियंत्रणात राहिल्यास महापालिकांच्या निवडणुका नियोजित वेळेतच होतील, असे स्पष्ट संकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी पुण्यात दिले. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यावर अनिल परब पुण्यात आले होते. त्यानंतर अनौपचारिक कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील कोरोना प्रदूर्भाव कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना नियमांचे पालन करावे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यास उद्योग, व्यावसाय, दळणवळण पूर्ण क्षमतेने सुरू होऊन राज्य प्रगतीपथावर येण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 18-Jun-21