नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक नेत्यांमध्ये कृषी कायद्याच्या तरतुदींवरून चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, त्यावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चर्चेसाठी पुन्हा एकदा तयारी दर्शवली असून, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केव्हाही चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. नवीन कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या कोणत्याही संघटनेशी किंवा नेत्यांशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:49 PM 18-Jun-21