माभळे : मुंबई-गोवा महामार्गावरील माभळे पुनर्वसन येथील रस्त्याला भले मोठे खड़े पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या पावसामध्ये हे खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. या मोठ्या पडलेल्या खड्डयांकडे बघायला हायवेचे काम करणाऱ्या कंपनीला वेळ नाही. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. किती अपघात झाल्यावर येथील खड्डे भरले जातील? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तरी संबंधित खड्डे तत्काळ भरावे, अशी मागणी वाहनचालक व प्रवासी यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 19-Jun-21