रत्नागिरी : आशा सेविकांवर महाविकास आघाडीने अन्याय केला आहे. त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा आपण नक्की करू, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. शिल्पा धनंजय मराठे यांनी केले. आशा सेविकांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत यासंदर्भात ७ जुलै रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर यांच्यामार्फत शासनाचे लक्ष वेधणार आहोत, असे सौ. मराठे यांनी स्पष्ट केले.सौ. मराठे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांचे करोनाच्या काळातील कामकाज फार उत्तम असल्याचे उद्गार काढले. परंतु आशा सेविकांनी प्रामुख्याने केलेली मानधन वाढ व आरोग्य विमा कवच या प्रामुख्याने मागण्या मान्य झालेल्या नाहीत. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना दिलासा मिळण्याऐवजी दुःख व यातना सहन कराव्या लागत आहेत. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री आशा सेविकांच्या मागण्यांच्या घोषणा करतात. प्रत्यक्षात त्यांना आशेवर ठेवले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. स्वतःच्या परिवाराची चिंता न करता आरोग्य सेवा देणे हेच उद्दिष्ट समोर ठेवून या सेविका गेल्या दीड वर्षांपासून करोना काळात काम करत आहेत. त्यामुळेच त्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास सौ. शिल्पा मराठे यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:52 PM 19-Jun-21