देवरूख : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देवरूख येथे छात्र संवाद उपक्रम पार पडला. अभाविप विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सध्या कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी छात्रसंवाद हा उपक्रम घेते. देवरूखमध्ये आठल्ये सप्रे पित्रे कॉलेजमध्ये हा उपक्रम पार पडला. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्थानिक पातळीवरील समस्या समजून, त्यावर योग्य समाधान काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. कॉलेजचे वाचनालय, इलेक्ट्रिसिटी यासारख्या सध्या वापरत नसलेल्या सुविधांची फी परत व्हावी हा बैठकीचा प्रमुख विषय होता. कार्यक्रमात महाविद्यालयाचे बहुतेक सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विठ्ठल परब यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 21-Jun-21