मुंबई : महिला धोरण हा एक क्रांतिकारी विचार होता जो शरद पवार यांनी मांडला व मंजूर करुन घेतला याची आठवण आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महिला धोरणाला आज २७ वर्षे पुर्ण होत असून खा. सुळे यांनी याबाबत ट्विट करत आपले विचार मांडले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात आज महिला अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करताना दिसत आहेत. शासन-प्रशासन चालवित आहेत, ही अतिशय आश्वासक बाब असून हा प्रवाह असाच अखंड सुरु राहील, असा विश्वासही खा. सुळे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधीची कवाडे खुली करणाऱ्या महिला धोरणाबाबत खा. सुळे यांनी ट्विट करत महिलांच्या कार्याची स्तुती केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:33 PM 22-Jun-21