पालघर : कोरोनाच्या संकटामुळे राज्याचं विधीमंडळ अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकार कोरोनाला घाबरत नसून विरोधकांना घाबरत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.चंद्रकांत पाटील आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. दोन दिवसाच्या अधिवेशनाने काय होणार आहे. किमान महिनाभरासाठी तरी अधिवेशन घेतलं पाहिजे. तरच जनतेच्या समस्यांवर चर्चा होईल. कोरोनाचं निमित्त पुढे करून अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेतलं जात आहे. ही सरकारची पळवाट आहे. हे सरकार कोरोनाला घाबरत नाही, तर विरोधी पक्षाला घाबरत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:18 PM 22-Jun-21