रत्नागिरीतील खराब रस्त्यांविषयी समविचारी मंचने केली होती तक्रार

0

रत्नागिरी : शहरातील खराब रस्त्यांविषयी तक्रार समविचारी मंचाने याआधीच केली आहे, असा खुलासा मंचातर्फे करण्यात आला. रत्नागिरी तक्रार निवारण कक्षात शहरातील रस्ते खराब असल्याची तक्रारच आली नसल्याचे जिल्हा प्रशासन म्हणत असेल तर ते निखालस खोटे असून महाराष्ट्र समविचारी मंचने याविषयी अनेक नागरिकांसह रीतसर ई-मेलद्वारे निवेदन दिले असल्याचे समविचारीचे बाबा ढोल्ये, संजय पुनसकर, रघुनंदन भडेकर, नीलेश आखाडे यांनी म्हटले आहे. शहरातील केवळ खराब रस्त्यांवरच नाही तर नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांवर आम्ही तात्काळ निवेदन देत असतो. आता जिल्हा प्रशासनासह संबंधित यंत्रणेला ती पोहोचत नसतील, वा ई-मेल गहाळ होत असतील तर ते ज्या जनतेसाठी आम्ही अवलंब करतो त्यांचे आणि आमचेही दुर्दैव आहे. गेल्या १२ जून रोजी समविचारी मंचातर्फे खराब रस्त्यांबाबत निवेदन दिले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी करून मंचाने जिल्हा प्रशासनाच्या एकूण भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:54 PM 23-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here