ओबीसी समाज बांधवांतर्फे रत्नागिरी तहसीलदारांना निवेदन सादर

0

रत्नागिरी : राज्यातील ३५८ तहसील कचेरीसमोर गुरुवार दि. २४ जून रोजी ओबीसी जनमोर्चा व सहयोगी संस्था यांच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी निदर्शने करण्यात आली. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्याचे वतीने तहसीलदार रत्नागिरी यांना ओबीसी समाज बांधवांतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार रत्नागिरी यांना सादर करण्यात आले. यावेळी शांताराम मालप, नंदकुमार मोहिते, शांताराम खापरे, राजीव कीर, तानाजी कुळये, प्रदीप घडशी, दीपक राऊत, मंदार नैकर व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:38 PM 24-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here