जिल्ह्यात नव्याने 540 कोरोना बाधितांची नोंद; तब्बल 20 जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 540 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.नव्याने 540 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 59 हजार 56 इतकी झाली आहे. नव्याने 540 रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 246 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 163 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर यापूर्वीचे 131 असे 540 जण पॉझिटिव्ह सापडले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 7.39% आहे.

तर 24 तासात तब्बल 20 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 1691 इतकी झाली असून मृत्युदर 2.84 टक्के इतका आहे.

बुधवारी 6 हजार 743 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता पर्यंत 3 लाख 38 हजार 650 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, 24 तासात 179 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 51 हजार 162 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 86.63 टक्के आहे.

जिल्ह्यात सध्या 6203 कोरोना बाधित सक्रीय रुग्ण आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:12 PM 24-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here