रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रत्नागिरी जिल्ह्यात धीम्या गतीने सुरू असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या १४ पुलांपैकी तीन वर्षांत एकही काम पूर्ण होऊ शकलेले नाही. धोकादायक वाशिष्ठी पुलाचे कामही रखडलेलेच आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेकदा या पुलावरील वाहतूक बंद करावी लागत आहे. मे. खरे तारकुंडे यांच्याकडे देण्यात आलेले १४ पूल आता चौपदरीकरणाच्या ठेकेदारांना देण्यात आले आहेत, तर चार पूल एमईपी यांच्याकडून काढून घेत स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पूल होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चौपदरीकरण पूर्ण होण्यास २०२२ चा मुहूर्त उजडणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 25-Jun-21