रत्नागिरी : मागील अनेक दिवसांपासून सरकारच्या नियमावलीमुळे मोबाईल दुकाने बंद आहेत. पूर्वीपासून असणारे ऑनलाईन कंपन्यांचे आक्रमण आणि त्यात लॉकडाऊन यामुळे मोबाईल विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. दुकानांची भाडी, बँकांची कर्ज, नोकरांचे पगार कसे भागवायचे हा मोठा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर आहे. सध्या हि दुकाने बंद असताना मात्र परराज्यातून आलेले फेरीवाले मात्र बिनधास्तपणे मोबाईल कव्हर व इतर एक्सेसरी विकताना दिसत आहे. रत्नागिरी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांच्या कानावर हि गोष्ट पडताच त्यांनी जुना माळ नाका येथे धाव घेतली. सोबत महासंघाचे सदस्य सुनील धनावडे, अमोल डोंगरे यांना सोबत घेत या फेरीवाल्यांना पिटाळून लावले. पुन्हा रत्नागिरीत दिसल्यास व्यवस्थित समजावण्यात येईल असे देखील सांगण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:34 AM 28/Jun/2021