पाचल ग्रामपंचायतीचा ‘रिफायनरी’ला पाठिंबा देणारा ठराव मंजूर

0

राजापूर : रिफायनरी प्रकल्प कोकणात राहणार की विदर्भात जाणार या विषयावरून दोन दिवस जोरदार मंथन सुरू असतानाच प्रस्तावित रिफायनरीच्या समर्थनार्थ आता प्रकल्प क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायती पुढे सरसावल्या आहेत. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाचलने रिफायनरीच्या समर्थनाचा एकमुखी ठराव मंजूर करून तालुक्यातच प्रकल्प राहावा, अशी मागणी केली आहे. रिफायनरी प्रकल्प समर्थनाचा ठराव उपसरपंच किशोर नारकर यांनी मांडला. त्याला ज्येष्ठ सदस्य शंकर ऊर्फ आण्णा पाथरे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वानुमते प्रकल्प समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला. शासनाच्या विविध पुरस्कारांवर यशाची मोहोर उमटविलेल्या पाचल ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सरपंच अपेक्षा मासये यांच्या अध्यक्षतेखाली पाचल ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली. त्यामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणीचा एकमुखी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. राजापूर तालुका औद्योगिकदृष्ट्या मागासलेला राहिलेला असून रिफायनरी प्रकल्पामुळे ज्या परिसरामध्ये हा प्रकल्प होणार आहे, त्या परिसरातील गावांचाच केवळ विकास होणार नसून त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यालाही होणार आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प तालुक्यामध्ये उभारावा, अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 01-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here