चिपळूण : मराठा आरक्षणप्रश्नी राज्यभरात पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. परंतु, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणे चुकीचेच होते. न्यायालय ही याचिका फेटाळणार याची कल्पना होतीच. परंतु, या प्रश्नावर केंद्र सरकार टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप शिवसेना सचिव व लोकसभेतील गटनेते खा. विनायक राऊत यांनी केला आहे. चिपळूण येथे तिवरे धरणग्रस्तांसाठी बांधलेल्या सिद्धिविनायक नगरीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते आले असता त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 03-Jul-21