संगमेश्वर : नेत्रावती, मस्त्यगंधा एक्स्प्रेस या कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या महत्वाच्या गाड्या आहेत. या गाड्या संगमेश्वर स्थानकात थांबत नसून त्यांना या स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी संगमेश्वरातील रेल्वे प्रवाशांनी केली आहे. संगमेश्वर स्थानकात या गाड्यांना थांबा दिल्यास मुंबई-ठाण्याला संगमेश्वरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असं प्रवासी संघटनेचं म्हणण आहे. या दोन गाड्यांना संगमेश्वरात थांबा द्यावा या मागणीसाठी प्रवासी संघटनेच्या संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेला निवेदनही दिले आहे. जर या गाड्यांना संगमेश्वरात थांबा मिळाला नाही तर 15 ऑगस्ट रोजी उपोषण करू असा इशारा जिमन यांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:27 PM 07-Jul-21