नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा बदल केला आहे. नव्या सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं असून सर्वच मंत्र्यांनी कामकाज सुरु केलं आहे. नवे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना आता २ शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैष्णव यांनी पदभार स्विकरल्यानंतर रेल्वेच्या कामकाजामध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. वैष्णव यांच्या आदेशानुसार आता रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यामुळे नागरिकांना अखंड सेवा पुरवण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना आता दोन शिफ्टध्ये काम करावे लागणार आहे. यातील पहिली शिफ्ट सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असणार आहे. तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयात अधिक काम करण्यासाठी दोन शिफ्टचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना अधिक वेळ काम करण्यापेक्षा त्यांना दोन शिफ्टमध्ये काम देण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पुयूष गोयल यांच्याकडे देण्यात आली होती. नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर ट्विटरला इशारा दिला आहे. आयटी नियमांबाबत ट्विटरला फटकारले आहे. देशाचा कायदा सर्वांसाठी समान आले आणि प्रत्येकाला त्याचे पालन करावे लागेल अशा इशारा ट्विटरला वैष्णव यांनी दिला आहे. भारतीय आयटी नियमांवरुन ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्या वाद सुरु असून हा वाद न्यायालयात पोहोचला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:17 PM 09-Jul-21