मोसम येथे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचा आ. राजन साळवींनी केला सत्कार

0

राजापूर : महावितरणच्या कामाला आपण नेहमीच शिव्या घालतो. वीजप्रवाह खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली सुरू होते; पण त्यांचे कामही अवघड आणि जीवावर बेतणारे असते. तालुक्यातील मोसम गावात पूरआला असतानाही महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल या दोघांचा आ. डॉ. राजन साळवी यांनी सन्मान केला. तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राजापूर शहरासह अनेक ठिकाणी पूर आला होता. मोसम गावातही पूर आला होता. तेथून पुढच्या काही गावांमध्ये वीज वाहिनी सदोष होती. त्यामुळे वीज खंडित करुन काम सुरू होते. मात्र, सोमवारी काम पूर्ण होईपर्यंत मोसम गावात पूर आला. जेथे पुरवठा सुरू करण्याचा खटका आहे, त्या बनवाडीतील खांबानजीक काही फूट पाणीवर चढले होते. मात्र, तेथील खटका सरू झाला नाही तर पुढची गावे अंधारातच राहतील. त्यामळे महावितरणच्या केळवली विभागात काम करणारे रुपेश महाडिक व दर्शन जोगले या दोघांनी धाडस केले. रूपेश महाडिक यांनी छातीपर्यंतच्या पाण्यातून खांबापर्यंत जाऊन खटका सुरू केला. त्यामुळे पुढची गावे प्रकाशमान केली. महावितरणचे कर्मचारी पावसातदेखील स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिक प्रयत्न करत असतात. त्यांचा सन्मान करण्यासाठी आमदार डॉ. राजन साळवी यांनी राजापूर महावितरणच्या कार्यालयाला भेट देऊन त्या शूरवीरांचे कौतुक केले व त्यांना सन्मानित केले. यावेळी माजी सभापती सुभाष गुरव, एस.व्ही बंडगर, कनिष्ठ अभियंता महेश हिरगुडे, सहायक अभियंता योगेश ठाकरे, सहायक अभियंता कांबळे, टी .जी. कदम, अमोल जगताप व कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 14-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here