काजळी नदीचा गाळ काढल्याने कोंडगाव पूरापासून बचावले

0

देवरुख : मौजे कोंडगावच्या हद्दीतील काजळी नदीचे ‘गाळ उपसा व खोलीकरण-रुंदीकरणा’चे काम पूर्ण करण्यात आल्याने कोंडगाव पुराच्या धोक्यापासून यावर्षी बचावले आहे. श्री दत्त देवस्थान, कोंडगाव, समस्त काजळीप्रेमींनी पुढाकार घेतल्यामुळे पुराचे धोक्याचे संकट टळले, यामुळे ग्रामस्थांनी या कामी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. या कामामध्ये कोणतीही वैयक्तिक अपेक्षा-स्वार्थ न ठेवता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राबणाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच या कामासाठी आर्थिक योगदान देणाऱ्यांचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले, असे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया येथील काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गेले चार दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला असूनसुद्धा, पूर्वीप्रमाणे पूरस्थिती निर्माण न होता, कोंडगाव बाजारपेठेत पाणी भरण्याचा पूर्वीसारखा धोका उद्भवला नाही. विशेषत: नदीतील गाळ उपसण्याकरिता ‘नाम फाउंडेशन’ने यांत्रिक सहकार्य करून मदत केल्यामुळे हे शक्य होऊ शकले, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 14-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here