कोल्हापूरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक जिल्हा दौऱ्यावर

0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं एक पथक आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून हे पथक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेणार आहे. चार सदस्यीय हे पथक दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाशी सोबत घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेणार आहे. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, त्याचबरोबर लसीकरण केंद्रांना देखील भेटी देणार आहे.

देशात आणि राज्यात बहुतांश ठिकाणी कोरूना परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. दिवसाला अजूनही एक हजार ते पंधराशे नवे रुग्ण आढळत असून पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्क्यांहून अधिक आहे. एका बाजूला राज्यात तिसरा लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच कोल्हापूर जिल्हा मात्र अजूनही दुसऱ्या लाटेतून मुक्त झालेला नाही.

कोल्हापुरातील या रुग्ण वाढीच्या आणि मृत्यू दराच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न हे पथक करणार आहे. रोजचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू बेडची स्थिती, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, तिसर्‍या लाटेसाठी केलेली तयारी याची सविस्तर माहिती प्रशासनाला या पथकाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे हे पथक येणार असल्याची सूचना मिळताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

कोल्हापुरात येणाऱ्या केंद्रीय पथक चार सदस्यांचा समावेश आहे. गृह व नगरविकास विभागातील सहसचिव कुणाल कुमार या पथकाचे नोडल ऑफिसर आहेत. याशिवाय राष्ट्रीय साथ नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ. अजित शेवाळे, कुटुंब कल्याण विभागाचे पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक डॉ. प्रणित कांबळे आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स विभागाचे सहसंचालक डॉ सत्यजित साहू यांचा यात समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:05 PM 15-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here