मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील मौजे गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने १९,६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे उजगाव येथील शंकर जानू गोरे यांच्या घराचे अतिवृष्टीने ८ हजार रुपये व जनार्दन देवजी धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: २९,५०० रुपये नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात मौजे वारदई गाव येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे पावसामुळे ३ लाख ५५ हजार रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर मौजे ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २७,६०० रुपये नुकसान झाले आहे. मौजे कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा पावसामुळे बांध पडल्याने घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मौजे भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:40 PM 15-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here