आंबा घाटाला ‘दख्खन’चा घाट असे नाव देण्याची आर्ते यांची मागणी

0

साडवली : रत्नागिरी-कोल्हापूर या प्रमुख मार्गावर साखरपा, मुर्शी, दख्खन गाव सोडल्यावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंबा घाट आहे. या घाटाचा आणि आंबा गावाचा तसा संबंध येत नाही. कारण रत्नागिरी जिल्ह्याची हद्द आंबा गावाआधी संपते. असे असताना या घाटाला आंबा घाट हे नाव कसे? असा सवाल देवरूखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी उपस्थित करून हा घाट संगमेश्वर तालुक्यातील दख्खन ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्यामुळे या घाटाला ‘दख्खन’चा घाट असे नाव देण्यात यावे, अशी मागणीही आर्ते यांनी केली आहे. आंबा घाट हा संगमेश्वर तालुक्यातील दख्खन ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. आंबा घाटाची जबाबदारी रत्नागिरी जिल्हा बांधकाम विभाग घेतो. साखरपा, मुर्शी व देवरूख पोलिस ठाणे या क्षेत्रातील तपासकाम हाताळते. हा घाट रत्नागिरी जिल्ह्याची शान असताना हद्द नसलेल्या गावाच्या नावाने हा घाट प्रसिद्ध कसा? या घाटाला खरेतर आपण दख्खनचा घाट असेच म्हणावे, असे मत आर्ते यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:12 PM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here