चिपळूण : दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा शहरासह ग्रामीण भागाला बसला आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून तालुक्यातील टेरव येथील घराचे छप्पर कोसळून नुकसान झाले आहे. प्रकाश राजाराम यादव, सचिन म्हालीम व गौरया साळवी यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे घरावरील छप्पर कोसळून नुकसान झाले असून या नुकसानीची सरपंच स्वप्नाली कराडकर, उपसरपंच पंडव, मानसी कदम, किशोर कदम, अशोक साळवी, उमेश मोहिते, काशिराम कदम, वर्षा वासकर आदी ग्रा.पं. सदस्यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व या बाबत तहसील कार्यालयाला कळविण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:03 AM 21-Jul-21