३० तासांपासून चांदेराई हरचेरी बाजारपेठ पाण्याखाली

0

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चांदेराई गावाला देखील पुराचा फटका बसला आहे. चांदेराई-हरचेरी मधील बाजारपेठेत गेले ३० तास पाणी आहे. बुधवारी रात्री बाजारपेठेत आलेले पाणी दिवसभर तसेच स्थिर होते. त्यानंतर कालच्या रात्री पुन्हा पाणी वाढण्यास सुरुवात झाली. तर चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली जावून पाणी लोक वस्तीत शिरले व चांदेराई मधील १५ घरे बाधित झाली. पावसाचा वेग कमी असतानाही साखरप्यात मुसळधार पाऊस लागत असल्याने रात्री १ वाजता पाणी लोक वस्तीत शिरू लागले. पाण्याचा वेग एवढा होता कि घरातील सामान सुरक्षित ठिकाणी ठेवताना ग्रामस्थांची पुरती दमछाक झाली. मात्र, परीस्थितीचे भान ठेवून अनेक लोक सामनाची उचलाउचल करण्यास मदत करत होते. काही वयोवृद्ध रुग्ण पण हलविले गेले. हरचेरी गावात देखील पाणी भरले असून सुमारे २५ घरे पुराच्या पाण्याने बाधित झाली आहेत. लोकांचे सगळे संसार उचलावे लागले. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन पासून फर्निचर व भांडी-कपडे उचलावे लागले तर गणपती कारखान्यातील गणपती देखील उचलावे लागले. गेले ३० तासांपासून चांदेराई हरचेरी बाजारपेठ पाण्याखाली असल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:35 PM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here