कराड : पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तर अजूनही तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता आहेत. या गावासह पाटण तालुक्यातील इतर नुकसानग्रस्त गावांना शुक्रवारी दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात अशा पद्धतीचा पाऊस पडला नव्हता. मात्र, सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरे, कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाच्यावतीने मदत कार्य पोहचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत,’ असं देसाई यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:21 PM 23-Jul-21