रत्नागिरी : खेड येथील पूरग्रस्तांसाठी लांजा येथील गुरववाडीतील सतीमाता आदर्श युवक मंडळाने मदत केली. पूरग्रस्तांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, मेणबत्ती अशा अत्यावश्यक वस्तू देण्यात आल्या. लांजा येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सतीमाता आदर्श युवक मंडळातर्फे नेहमीच केले जाते. यावेळी खेड आणि चिपळूण येथे आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यांना मदत करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे मंडळाने ठरविले. खेड येथील पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, मेणबत्ती अशा अत्यावश्यक वस्तू देण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी निधी जमविण्यात आला आणि या वस्तूंची खरेदी करून लगेचच ती खेडकडे रवाना करण्यात आली. या उपक्रमासाठी अध्यक्ष किरण गुरव, अभिषेक गुरव, सूरज गुरव, दत्तप्रसाद घाग इत्यादींनी यांनी साहाय्य केले. मंडळातर्फे किरण गुरव, अभिषेक गुरव, दत्तप्रसाद घाग, सूरज गुरव, विवेक कनावजे, विशाल कांबळे, चंद्रशेखर (बाबा) धावणे, दाजी गडहिरे, अनिकेत शेट्टे, दीपक शेट्टे यांनी मदत प्रत्यक्ष पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविली. तातडीने मदत मिळाल्याने पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:41 PM 27-Jul-21