अद्याप CAA चे नियम तयार नाहीत; गृह मंत्रालयाने मागितली 6 महिन्यांची मुदत

0

केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे(CAA)नियम अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंगळवारी संसदेत याबाबत माहिती देण्यात आली. तसेच याचे नियम तयार करण्यासाठी गृहमंत्रालयाने आणखी सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. केंद्रीय गृह मंत्रालायाने एका प्रश्नाला उत्तर देताना या कायद्यातंर्गत नियम बनवण्यासाठी 9 जानेवारी 2022 पर्यंतची वेळ मागितली आहे.

लोकसभेत काँग्रेस नेते गैरव गोगोई यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. केंद्र सरकारने CAA नियम ठरवण्याबाबत कालमर्यादा निश्चित केली आहे काय, केली असेल ती काय आहे आणि नसेल केली तर अद्याप कालामर्यादा का ठरवण्यात आली नाही, अशी विचारणा त्यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. 2020 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला कायद्याचे रुप देण्यात आले. राज्यसभा आणिलोसभेतील समित्या या काद्यातंगर्त नियम तयार करत आहेत. त्यांनी यासाठी जानेवारी 2020 पर्यंतचा वेळ मागितल्याची माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारकडून 2019 मध्ये नागरिकत्व संधोधन विधेयक मांडण्यात आले. त्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशमधून आलेल्या हिंदू,शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायाच्या शरणार्थींना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याला देशाभरातील विविध ठिकाणी विरोध करण्यात आला होता. विरोधी पक्षांनीही या विधेयकाला विरोध केला होता. मात्र, विधेयकाला कायद्याचे स्वरुप प्राप्त झाल्यानंतर देशात कोरोनाचा प्रकोप सुरू झाला. त्यामुळे याचे नियम बनवण्यासाठी केंद्राने जास्त मुदत मागितली होती. आता या कायद्याचे नियम बनवण्यासाठी जानेवरी 2022 पर्यंतची मुदत मागण्यात आली आहे.

त्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:52 PM 27-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here