रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदीकाळात मासेमारी करणाऱ्या ६ नौकांवर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. जयगड बंदरात ही कारवाई करण्यात आली असून सर्व नौकांवरील मासळी जप्त करण्यात आली. नौका मालकांविरूद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार खटला दाखल करण्यात येणार असल्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त एन.व्ही.भादुले यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. पावसाळी बंदी आणि वादळसदृश काळात ६ नौका मासेमारी करून जयगड बंदरात आल्याची माहिती मिळाली. लगेचच सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी परवाना अधिकारी स्मितल कांबळे, दिप्ती साळवी, अंमलबजावणी अधिकारी तृप्ती जाधव, लिपिक रोहित सावंत, सुरक्षा रक्षकांसह पर्यवेक्षक तुषार करगुटकर यांच्या पथकाला जयगड बंदरात पाठवून नौका तपासणी करण्यास सांगितले. पकडलेल्या नौकांमधील मासळी जप्त करून लिलावाने मिळालेले १५ हजार ४३५ रुपये शासन जमा करण्यात आले. नौकामालक जयेश धनाजी नाखवा, सुनल करंजेकर, गोपाळ चव्हाण, शशिकांत कोळी, दत्ताराम नाखवा, मधुकर नाखवा (जय गणेश) यांच्या विरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:15 PM 27-Jul-21