रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग आणखी पाच दिवस बंद राहणार

0

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर एनएच १६६ महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या सेक्शनमध्ये १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे, महामार्गाचे नुकसान झाले आहे, तसेच महामार्गाचा काही भाग तीन ठिकाणी तुटला आहे. सदर ठिकाणी महामार्गावरील दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील मलबा काढण्याचे काम यद्ध पातळीवर सुरू आहे आणि खचलेला भराव दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. सदर दुरुस्तीचे काम पुढील पाच दिवस चालू राहणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस महामार्ग बंद राहणार आहे आणि त्यानंतर सदर महामार्गाची परत पाहणी करून, महामार्गावर फक्त हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करता येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूरचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:20 AM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here