कोळकेवाडी धरणातील पाणी विसर्गाची चौकशी व्हावी : खासदार सुनील तटकरे

0

चिपळूण : जर धरण पुनर्वसन व सुधारणा समितीचे अध्यक्ष दीपक मोडक आणि स्थानिक मंत्री, अधिकारी यांच्या विधानांमध्ये विरोधाभास असेल तर जनेतच्या मनात शंका निर्माण होत आहे. त्यामुळे जनतेचे शंकानिरसन होण्यासाठी कोळकेवाडी धरणातून किती पाणी सोडले, पाणी सोडताना चिपळुणातील लोकांना इशारा का दिला नाही, या बाबत जलसंपदामंत्र्यांनी चौकशी समिती नेमून यासंदर्भात पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि अहवाल जनतेसमोर यायला हवा त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चौकशी करावी, अशी मागणी आपण जलसंपदा मंत्र्यांकडे करणार आहोत, असे माजी जलसंपदामंत्री व खासदार सुनील तटकरे यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरातील नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी तटकरे हे शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 31-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here