नवी दिल्ली : ज्या जिल्ह्यांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आहे, अशा ठिकाणचे निर्बंध कडक करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने शनिवारी सर्व राज्यांना दिले. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असलेल्या दहा राज्यांच्या प्रतिनिधींशी आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या राज्यांबरोबरच ज्या राज्यांत कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे, अशा राज्यांना आरोग्य खात्याने पाचारण केले होते. या राज्यांत केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर यांचा समावेश आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 02-Aug-21