चिपळूण : जिल्हा प्रशासनाच्या नव्या आदेशाने चिपळुणातील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी पूर्णवेळ सवलत देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नव्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात बाजारपेठेतील दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्यास निर्बंध होते. मात्र, जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू गरज व वेळेनुसार उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने वेळेचे बंधन शिथील केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 03-Aug-21