पुणे : कोल्हापूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेमार्गाचे नुकसान झाले होते. यामुळे रेल्वेसेवा अंशत: खंडित केली होती. मात्र आठवडाभरातच या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, कोल्हापूरकडे रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे कोल्हापूर, सांगली भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागातील मिरज ते कोल्हापूर दरम्यानच्या मार्गावर ट्रॅक धोकादायक झाला होता. या पार्श्वभूमीवर मिरज ते कोल्हापूर दरम्यानची रेल्वे सेवा खंडित केली होती. पावसामुळे 6 ठिकाणी नुकसान झाले. या ठिकाणी भराव टाकणे, रुळांची दुरुस्ती करणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहे. यानंतर या मार्गाची तपासणी करून सेवा सुरू करण्यात आली. सोमवारी पहिली प्रवासी रेल्वे कोल्हापूरकडे रवाना झाली, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 03-Aug-21