आंबा घाट आजपासून वाहतुकीस खुला होण्याची शक्यता

0

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट बुधवारी दुपारपासून वाहतुकीस खुला करण्याची तयारी आणि नियोजनही झाले आहे. गेल्या तेरा दिवसांपासून आंबा घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रस्ता खचल्याने आणि दरड पडल्याने या आंबा घाटातील वाहतूक २२ जूनपासून बंद ठेवण्यात आली होती. आंबाघाटात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळली होती. दख्खन येथे कोसळलेली दरड फारच मोठ्या प्रमाणात होती. त्याचबरोबर या कोसळलेल्या दरडीमुळे या ठिकाणी रस्ताही नादुरुस्त झाला होता. कळपदरा येथे दरीच्या बाजूने असलेला रस्ता साईडपट्टीसह खचून दरीत कोसळला होता. त्यामुळे गेल्या २२ जूनपासून आंबा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आंबा घाटात कोसळलेल्या सर्व ठिकाणची दरड हटवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रस्ता नादुरूस्त झाला तोही दुरूस्त करण्यात आला आहे. कळपदरा येथे घाटातील अर्धा रस्ता खचून साईडपट्टीसह दरीत कोसळला. त्यामुळे या घाटातील वाहतूक धोकादायक बनली होती. वेळीच पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने इतर काही ठिकाणी ज्या दरडी कोसळल्या त्याचा काहीही धोका झाला नाही. आता मात्र हा घाट वाहतूकीस खुला करण्याबाबतची तयारी आणि नियोजन पूर्ण झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:20 AM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here